मुक्त्यारीसमारंभ

300.00

आपण साक्षीदार असलेल्या महत्त्वाच्या घटना किंवा त्याबद्दलच्या हकिकती लिहून ठेवणे ही सवय भारतीयांत फारशी आढळत नाही. यामुळे भारताचा इतिहास शोधताना विदेशी व्यक्तींनी लिहून ठेवलेल्या हकिकती हा आपल्या इतिहासाचा फार मोठा आधार मानला जातो. याचं उदाहरण द्यायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासारखी अभूतपूर्व घटना आपल्याला हेन्री ऑक्झेंडन या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्याने लिहिलेल्या डायरीच्या आधारे समजून घ्यावी लागते

राजर्षी शाहू महाराजांचा राजकीय आणि सामाजिक क्षितिजावर उदय होणे ही 20व्या शतकाच्या पूर्वार्धात घडून आलेली अतिशय महत्त्वाची घटना होती आणि तख्तारूढ छत्रपती म्हणून राजर्षी शाहू महाराजांकडे समाजाचे नेतृत्व जाणे हे अतिशय सुसंगत होते. या सर्व स्थित्यंतराची नांदी मानता येईल, अशी घटना म्हणजे त्यांचे राज्यारोहण

2 एप्रिल 1894 रोजी पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्याचे एका प्रत्यक्षदर्शीने केलेले वर्णन नव्या संशोधित आणि संपादित रूपात वाचकांसाठी आणि इतिहास अभ्यासकांसाठी प्रस्तुत पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध होत आहे.

Categories: ,

लेखकाविषयी

यशोधन जोशी हे मूळचे कोल्हापूरचे असून ते गेली अनेक वर्षे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचे ते अभ्यासक आहेत. आठवणीतील शिकारया संस्थानकालीन शिकारीबद्दल माहिती देणाऱ्या पुस्तकाचे त्यांनी लेखन केलेले आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचे नानाविध पैलू उलगडून दाखवणाऱ्या धांडोळाया लोकप्रिय ब्लॉगचे ते लेखक आहेत. विविध दिवाळी अंक, वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमातून ते नियमित लेखन करत असतात. स्थानिक इतिहास हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्यांनी कोल्हापूरचे अनेक अज्ञात पैलू प्रकाशात आणलेले आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मुक्त्यारीसमारंभ”

Your email address will not be published. Required fields are marked *